भारत-बांगलादेश सीमेवर तणाव   

लष्कर आमने-सामने

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण असताना आता बांगलादेश सीमेवरही दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आले आहे. बांगलादेशच्या कुरीग्राम आणि आणि आसामच्या मानकाचरच्या भारतीय सीमा सुरक्षा दल आणि बांग्लादेश सीमा रक्षक आमने-सामने आले असून दोन्ही बाजूकडून गोळीबारदेखील करण्यात आला.
 
भारताने अलीकडे बेकायदा घुसखोरी करणार्‍या बांगलादेशी नागरिकांना परत पाठविण्याची मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत ४ मे २०२५ पासून शेकडो बांगलादेशींना परत पाठवण्यात आले आहे. कालही सीमा सुरक्षा दलाचे जवान १४ घुसखोरांना परत पाठवण्याचा प्रयत्न करत होते. यामध्ये ९ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश होता. बांगलादेशी सैनिकांकडून घुसखोरांना परतावून लावले जात असताना अडथळा आणला जात होता. यावरुन, दोन्ही बाजूकडून गोळीबार करण्यात आला. सध्या बांगलादेशात राजकीय गोंधळ सुरु आहे. बांगलादेशाच्या हंगामी सरकारचे प्रमुख महमद युनूस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तसेच बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 
 

Related Articles